=======================
*वरोरा*
=======================
भारताचा इतिहासात १४ फेब्रुवारी हा काळा दिवस म्हणून मानला जातो.कारण याच दिवशी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४०जवान शहीद झाले होते.त्या प्रीत्यर्थ पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शुर वीरांना आज शहीद योगेश डाहुले चौक,वरोरा येथे श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.त्यांची सेवा आणी आपल्या देशासाठीच त्यांचं बलिदान नेहमीच आपल्या स्मरणात राहील या वेळी “अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे” असा जयघोष करण्यात आला.या प्रसंगी अहेतेशाम अली – माजी नगराध्यक्ष न. प.वरोरा,माजी सैनिक सुबोध बोभारे,प्रविण चीमुरकर,योगेश ठेंगणे,संतोष थैरे,सुयोग बुराण,गणेश मडावी,ठोके साहेब, प्रभाकर उपरे,काकडे साहेब, हक्के साहेब, सोबत आशिष ठाकरे,ओम मांडवकर, विठ्ठलजी लेडे, डॉ.सागर वझे,दिलीप घोरपडे,जगदीश तोटावार, घुडे महाराज,संजय राम, कादर शेख या सर्वांची उपस्थिती होती.
============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069