चेन्नई वरुन दिल्ली कडे जात असलेली मुक्तीसंदेश यात्रा चंद्रपूरात पोहचताच आमदार किशोर जोरगेवार यांनी गांधी चौक येथे सदर यात्रेचे स्वागत केले. यावेळी यात्रेत सहभागी बांधवांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाचही वितरण करण्यात आले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार, कालीदास धामनगे आदींची उपस्थिती होती.
पंडिता रमाबाई स्मृतिशताब्दी निमित्त व्हिजन इंडिया द्वारा चेन्नई ते दिल्ली मुक्तीसंदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी ही यात्रा चंद्रपूरात दाखल झाली. यावेळी सदर यात्रा गांधी चौक येथे पोहचताच आमदार किशोर जोरगेवार यांनी यात्रेचे स्वागत केले. यावेळी सदर यात्रेत चेन्नई पासुन सहभागी असलेल्या चार युवकांचा शाल श्रीफळने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी यात्रेत सहभागी बांधवांना शितपेय देण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे वेणु कोडेल, अमन खान, रितेश बिश्वास, अक्षय चाहांदे, साई कोटा, विवेक कनकम, प्रकाश इलटम, बबलु मेश्राम यांच्यासह यंग चांदा बिग्रेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793