चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथे झाशी राणी ब्रिज या ठिकाणी पोंभूर्णा मार्गे येणारे जड वाहतूक हे लालपेठ कामगार चौक येथून फिरून जाण्याच्या ऐवजी विरुद्ध दिशेने बुद्ध नगर या वार्डातून जातात ज्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी झाले आहेत अनेक अपघातामध्ये लोकांना यमचे अपंगत्व आलेले आहे . अर्धा अर्धा तास ट्रॅफिक जाम असते रस्त्यांची खराबी सुद्धा या जड वाहतुकीने वारंवार होत असते प्रशासनाला जनतेने वारंवार तक्रारी देऊन सुद्धा यावर कार्यवाही न झाल्याने येथील नागरिकांनी आपचे शहर सचिव राजू कुडे यांच्याकडे तक्रार दिली . यावर आज आम आदमी पार्टी चंद्रपूर तसेच बाबूपेठ येथील पदाधिकारी यांच्या नेतृत्वात वाहतूक नियंत्रण शाखा चे पोलीस निरीक्षक माननीय श्री पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले जर येत्या चार दिवसात विरुद्ध दिशेने येणारे जड वाहतूक थांबले गेले नाही तर बायपास वरील महामार्ग हा जनतेला सोबत घेऊन आम आदमी पार्टी रोखून धरेल आणि होणाऱ्या परिणामास पोलीस प्रशासन तसेच बांधकाम विभाग हे जबाबदार राहतील असे आपचे
शहर सचिव राजू कुडे यांनी म्हटले आहे , यावेळेस आपचे बाबूपेठ प्रभागाचे अध्यक्ष इंजि . श्री अनुप तेलतुंबडे , झोन 3 चे सचिव श्री विनोद भाऊ रेबावार , सिद्धार्थ नगर वार्ड अध्यक्ष रूपम ताकसांडे , संजय पडोळे , कृष्णाजी सहारे , अजय बाथव , सागर बोबडे , कालिदास ओरके , अभिषेक टेंभुर्ने , जयदेव देवगडे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793