—————————-
येथील भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे रविवारी,30 एप्रिलला प्रिदर्शीनी सभागृहात सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 100 व्या मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रसारण व आयोध्या येथील श्री राम मंदिरासाठी पाठविण्यात आले काष्ठ पूजन प्रसंगी आयोजित विविध स्पर्धा पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी लोकनेते ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार(मंत्री-वने,मत्स्यपा
मन की बात कार्यक्रमातून विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतात.या संवादामुळे देशहिताच्या अनेक कल्पना समोर आल्या व जनतेनी सुचविलेल्या विविध सुयोग्य विषयांची अंमलबजावणी करण्यात आली. यंदा रविवार 30 एप्रिलला मन की बातचे 100 वे पुष्प गुंफले जाणार आहे. याचे थेट प्रसारण बघण्याची व्यवस्था प्रियदर्शिनी सभागृहात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वेळी, अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरासाठी पाठविण्यात आलेल्या काष्ठ पूजन व शोभायात्रा प्रसंगी आयोजित रांगोळी व वेशभूषा स्पर्धेचे पुरस्कार वितरित केले जाणार आहे.
नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. मंगेश गुलवाडे (जिल्हाध्यक्ष, महानगर भाजपा),भाजपा नेते राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासंगोट्टुवार, रविंद्र गुरुनूले,राखीताई कंचर्लावार, अंजलीताई घोटेकर, विशाल निबाळकर, राहुल पावडे संदीप आवारी, संजय कंचर्लावार, रवि आसवाणी, प्रकाश धारणे, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, विठ्ठल डुकरे,संदिप आगलावे,सचिन कोतपल्लीवार, किरणताई बुटले, धम्मप्रकाश भस्मे,धनराज कोवे,आमिन शेख,विनोद शेरकी, डॉ. दिपक भट्टाचार्य यांनी केले आहे.
***************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*****************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793