***वनमंत्री चंद्रपूरचे असून सुद्धा शेतकरी भयभीत शेतकऱ्यांना वाचवा :जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले* **

0
37

संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत आहेत वारंवार अश्या घटना जिल्ह्यात घडत आहेत अजून एक नवीन चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील निलसनी पेठगाव या गावातील
कैलास लक्ष्मण गेडेकर (47) र. निलसनी पेठगाव ता. सावली जि. चंद्रपुर असे मृतकाचे नाव आहे.
सावली वन परिक्षेतत्रा अंतर्गत येत असलेल्या उप वन क्षेत्र व्याहाळ खुर्द परिसरातील निलसनी पेठगाव येथील कक्ष क्र 201 हे शेत जमीनी लगतचे क्षेत्र असून या भागात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांचा वावर आहे. दिवसा धानपिकाच्या कापनी बांधणीचे असल्याने अनेक शेतकरी परिवारासह शेतात काम करताना दिसतात किंवा जंगल परिसरात सर्पनासाठी जात असतात. या भागातील अनेक शेत जमीनी झुडपी जंगल व्याप्त असून नेहमीच या भागात वन्य जीवांचा धोका असतो तरीही शेतकरी आपला जीव मुठित घेऊन शेतशिवाराची कामे करताना दिसतात.घटनेच्या दिवशी मृतक शेतात गेला होता परंतु उशिरा पर्यंत घरी न परतल्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली.घटनेच्या दुस-या दिवशी शेता लगथ मूर्त अवस्था आळलेला तरी स्वाभिमानी पक्ष्याचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून त्या परिवार भेट दिले व एक मोठा प्रश्न निर्माण झाल आहे की एवढे वारंवार घटना होऊन सुद्धा महाराष्ट्राचे वनमंत्री हे चंद्रपूर जिल्ह्याचे असून सुद्धा शेतकरी भयभीत आहेत वन अधिकारी गरिब शेतकरी लोकांनकडे दुर्लक्ष करत आहे शेतकऱ्यांच्या जीवाची तुम्हाला कदर नाही का असा असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी केला आहेत निलसनी पेठगाव येथील वाघाची जी दहशत त्या वाघाला जेरंबद करा, वनक्षेत्र लगत शेतीला फेन्सिंग करा,गावात व मुख्य रास्ताच्या बाजूला चौफेर सौरऊर्जा चे लाईट बसवा ही मागणी करण्यात आली आहे

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here