HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) : येथील पवित्र दीक्षाभूमीवर जाऊन भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी बाबासाहेबांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या विचारांचा वारसा जपत समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा संकल्प दृढ करण्यात आला.
त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजहितासाठी सदैव कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























